Friday, January 16, 2026

National

spot_img

विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन संपन्न

विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन संपन्न 954 शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे सादरसंजीव भांबोरे भंडारा- विदर्भवादी शेतकरी संघर्ष समिती च्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता दिनांक 21 ऑगस्ट 2025 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलनाचे अजून करण्यात आलेले होते. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भवादी शेतकरी संघटनेचे नेते सदानंद धारगावे यांनी केले. या जन आक्रोश आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी, सन २००६ ला पारित झालेला स्वामीनाथन आयोग तात्काल लागू करण्यात यावा, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे एकरी 50,000/ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकरी, शेतमजूर, श्रावण बाळ, विधवा महिला ,निराधार व अपंग यांना प्रति महिना 6000/ हजार रुपये देण्यात यावे व्यापारी फेडरेशन ला 5 किलो ओलावा घेतात ते रद्द करण्यात यावे, विजेचे बिल तात्काळ माफ करण्यात यावे ,शेतकऱ्या, 15 ऑक्टोंबर पर्यंत धानाचे काटे सुरू करण्यात यावे, प्रकल्पग्रस्त सुशिक्षित दिवसाचे बेरोजगार आरक्षण ५ टक्के ऐवजी 15 टक्के करण्यात यावे, समृद्धी महामार्ग करिता शेतकऱ्यांची जमीन संपादित करत आहात त्यांच्या जमिनीचा मोबदला ठरविण्यात यावा, याबाबत सविस्तर वृत्त असे की ,सततचे 4 ते 5 वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक होत नाही त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पिकाच्या सामना करावा लागतो आणि वारंवार अवकाळी पाऊस पडतो व शेतकऱ्यां चे पीक भुईसपाट होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाच्या डोंगर उभा झालेला आहे .काही शेतकऱ्यांना गहाण ठेवून बँकेचे व सहकारी संस्थेचे कर्ज भरावे लागते. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. आणि शेतकऱ्यांवर नाईराजास्त आत्महत्या करण्याची वेळ येत आहे . त्यामुळे शासनाने तात्काळ कर्जमाफीची घोषणा करावी आणि शेतकऱ्यांचे जीव वाचवावे . मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केले आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भारताचे कृषिमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेले आहे . यावेळी जिल्हाधिकारी भंडारा यांना विदर्भवादी संघर्ष समितीमार्फत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे अर्ज भरून देण्यात आले. त्यात खालील गावांचा समावेश आहे चिखली 10 ,दिघोरी मोठी 5 ,लोणारा 23, ब्राह्मणी 10, ईटगाव 43, वासेळा 9 गोसेखुर्द 6, कुर्जा 9 ,कोंडा 17 ,चिचाड 6, आकोट 22 , वलनी 41 , शिवनाळा 11, कोदुरली 15 , भेंडाळा11, धानोरी 2 ,भोजापूर 16, वळेगाव 2,मांगली 19, सेंद्रिखुर्द,7,सेंद्रिय बुद्रुक 15 कोसरा 11, लावडी 9,विरली बुद्रुक 28, बोरगाव 24 ,खैरी तेलोता 5, फनोली 17 , भावड 6,अत्री7 बाचेवाडी 11, ब्रह्मी 14, पिंपळगाव11,पिलांद्री 16 तिरी 4,करलेवाडा 15, कमकाझरी 17 , मिंसी 27, चकारा,16,गोलेवाडी 12 ,उमरी 9, विरली कंदार 24, खैरी तिरी 10 , माडगी 2, टेकेपार 9 , चोवा 13, मेंढा 7, बासोरा 17, गराडा खुर्द 50, नवेगाव 3, सोनेगाव 5 बोरगाव बुद्रुक 12, मानेगाव 31, वाकेश्वर 31 ,चिखलपहेला 22 ,बोरगाव खुर्द 2,निमगाव 23, चांदोरी 12, अड्याळ 45 , खैरेदिवाण ६१ ,पचखेडी 4 अंबाडी 11, असे एकूण 954 अर्ज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले.आंदोलन यशस्वी करण्याकरता नम्रता बागडे उपाध्यक्ष ,,मनीषा भांडारकर विदर्भ कार्याध्यक्ष, सोमना सरोजकर विदर्भ अध्यक्ष, वैशाली रामटेके भंडारा जिल्हाध्यक्ष, सीमा काळे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष पूजा पाटील विदर्भ उपाध्यक्ष, संगमित्रा चव्हाण भंडारा जिल्हा उपाध्यक्ष,चरण शहारे, ,पांडुरंग नंदागवळी , , प्रकाश ठवकर, ,विनायक भोयर, दशरथ भोयर ,शामराव बडगे ,देवराम कातोरे, लिलाबाई अंबादे रमेश भोईर रामा टिचकुले, महादेव बडगे ,भाऊराव भोयर, हंसराज अंबादे,सुनंदा टिचकुले, रामकृष्ण वैद्य ,लक्ष्मी वैद्य ,ज्ञानेश्वर टिचकुले प्रफुल सुखदेव ,शरद बडगे ,सोपान ठवकर , मोरेश्वर देऊळकर ,सहादेव टिचकुले ,वनिता ठवकर ,रघुवीर टिचकुले सारू कानतोडे ,श्यामराव कावळे, मारुती वैद्य , मारुती कावळे, मुक्ता सुखदेवे, पार्वता चौधरी ,नीलकंठ टिचकुले ,परमेश्वर टिचकुले ,सुभाष टिचकुले सुधीर सुखदेवे ,गंगा वैद्य ,अशोक टिचकुले ,अस्मिता भोयर ,प्रल्हाद सुखदेवे ,भोलाराम ठवकर, सुरेश बडगे , राजकुमार मेश्राम, गुरुदेव कातोरे, आसाराम बावनकर, भधु शेलोकर किशोर फळे भाऊराव देशमुख, मनीषा घोडेस्वार, पुंडलिक उकरे, मूलचंद तीघरे, मूलचंद रिचडे काळुबाई कानतोडे सतीश बावनकर देवराव वंजारी, कवळू धरमशहारे, रंजू रामटेके प्रिया राऊत ,प्रियंका ,कांबळे यांनी सहकार्य केले.

Previous article
भंडारा स्मशान भूमीत बौद्ध धर्मीयांना अंत्यसंस्कार करण्यास मनाई मुख्याधिकारी नगर परिषद यांनी आदेश काढून लावला फलकबौद्ध धर्मीय विविध धार्मिक व सामाजिक संघटनेनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन – संजीव भांबोरेभंडारा -भारत हे एक धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य राष्ट्र आहे .भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 नुसार प्रत्येक भारतीयांना त्यांचे धार्मिक, उपासना व आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे .त्यानुसार शासनाने प्रत्येक शहरात व गावात त्यांच्या नागरिकांच्या अंत्यसंस्कारा करिता सार्वजनिक स्मशानभूमी निर्माण केल्या आहेत व या स्मशानभूमीची देखरेख व सुव्यवस्था करण्याची जबाबदारी स्थानिक नगर परिषद /ग्रामपंचायत यांच्याकडे सोपीली आहे .या दोन्ही संस्थांना त्यांच्या शहरातील/ गावातील नागरिकांच्या /लोकांच्या जन्म मत्यूची नोंद ठेवतच मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधी व अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्याचे कर्तव्य पार पाडावे लागते. परंतु नगरपरिषद भंडाऱ्याचे मुख्याधिकारी यांनी त्यावर मात करून व आपले कर्तव्य विसरून ‘भंडारा स्मशानभूमीत हिंदू धर्मीयाव्यतिरिक्त इतर धर्मीयांचा अंत्यविधी होणार नाही याची नोंद घ्यावी ‘अशा प्रकारचा फलक स्मशानभूमीत लावलेला आहे. त्यामुळे या वादग्रस् फलकामुळे बौद्ध धर्मीयांना स्मशानभूमीच नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे. एवढेच नव्हे तर बौद्ध धर्मियांनी त्यांच्या घरातील पार्थिवाची विल्हेवाट सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी करावी काय ? हा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नगरपरिषदेच्या त्या बेकायदेशीर फलकामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मीयात वर्षानुवर्षे या स्मशानभूमीत होत असलेल्या अंत्यसंस्कारावरून तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता व सलोख्याला तडा जाऊ शकतो म्हणून वर्तमान गंभीर परिस्थितीचा विचार करून स्मशानभूमीत लावलेला व दोन धर्मीयात तेढ निर्माण करणारा फलक त्वरित काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी महोदय यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना देण्यात यावे. व त्यांना या बेकायदेशीर कृत्याबद्दल समजल द्यावी अशा मागणीचे निवेदन बौद्ध धर्मीय विविध धार्मिक व सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 20 ऑगस्ट 2025 ला 5 वाजत देण्यात आले आहे. शिष्टमंडळात अमृत बन्सोड ,मन्साराम दहिवले, महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम ,परमानंद मेश्राम, मोरेश्वर गेडाम, गुलशन गजभिये आहूजा डोंगरे, भावेश कोटांगले, कार्तिक मेश्राम, चंद्रशेखर खोब्रागडे ,सचिन गेडाम ,कपिला रामटेके, अरविंद काणेकर ,आर. आर . बन्सोड धर्मेंद्र,गोसावी इत्यादींच्या समावेश होता.
Next article

International

spot_img

विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन संपन्न

विदर्भवादी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन संपन्न 954 शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे सादरसंजीव भांबोरे भंडारा- विदर्भवादी शेतकरी संघर्ष समिती च्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता दिनांक 21 ऑगस्ट 2025 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलनाचे अजून करण्यात आलेले होते. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भवादी शेतकरी संघटनेचे नेते सदानंद धारगावे यांनी केले. या जन आक्रोश आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी, सन २००६ ला पारित झालेला स्वामीनाथन आयोग तात्काल लागू करण्यात यावा, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे एकरी 50,000/ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकरी, शेतमजूर, श्रावण बाळ, विधवा महिला ,निराधार व अपंग यांना प्रति महिना 6000/ हजार रुपये देण्यात यावे व्यापारी फेडरेशन ला 5 किलो ओलावा घेतात ते रद्द करण्यात यावे, विजेचे बिल तात्काळ माफ करण्यात यावे ,शेतकऱ्या, 15 ऑक्टोंबर पर्यंत धानाचे काटे सुरू करण्यात यावे, प्रकल्पग्रस्त सुशिक्षित दिवसाचे बेरोजगार आरक्षण ५ टक्के ऐवजी 15 टक्के करण्यात यावे, समृद्धी महामार्ग करिता शेतकऱ्यांची जमीन संपादित करत आहात त्यांच्या जमिनीचा मोबदला ठरविण्यात यावा, याबाबत सविस्तर वृत्त असे की ,सततचे 4 ते 5 वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक होत नाही त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पिकाच्या सामना करावा लागतो आणि वारंवार अवकाळी पाऊस पडतो व शेतकऱ्यां चे पीक भुईसपाट होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाच्या डोंगर उभा झालेला आहे .काही शेतकऱ्यांना गहाण ठेवून बँकेचे व सहकारी संस्थेचे कर्ज भरावे लागते. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. आणि शेतकऱ्यांवर नाईराजास्त आत्महत्या करण्याची वेळ येत आहे . त्यामुळे शासनाने तात्काळ कर्जमाफीची घोषणा करावी आणि शेतकऱ्यांचे जीव वाचवावे . मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केले आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भारताचे कृषिमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेले आहे . यावेळी जिल्हाधिकारी भंडारा यांना विदर्भवादी संघर्ष समितीमार्फत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे अर्ज भरून देण्यात आले. त्यात खालील गावांचा समावेश आहे चिखली 10 ,दिघोरी मोठी 5 ,लोणारा 23, ब्राह्मणी 10, ईटगाव 43, वासेळा 9 गोसेखुर्द 6, कुर्जा 9 ,कोंडा 17 ,चिचाड 6, आकोट 22 , वलनी 41 , शिवनाळा 11, कोदुरली 15 , भेंडाळा11, धानोरी 2 ,भोजापूर 16, वळेगाव 2,मांगली 19, सेंद्रिखुर्द,7,सेंद्रिय बुद्रुक 15 कोसरा 11, लावडी 9,विरली बुद्रुक 28, बोरगाव 24 ,खैरी तेलोता 5, फनोली 17 , भावड 6,अत्री7 बाचेवाडी 11, ब्रह्मी 14, पिंपळगाव11,पिलांद्री 16 तिरी 4,करलेवाडा 15, कमकाझरी 17 , मिंसी 27, चकारा,16,गोलेवाडी 12 ,उमरी 9, विरली कंदार 24, खैरी तिरी 10 , माडगी 2, टेकेपार 9 , चोवा 13, मेंढा 7, बासोरा 17, गराडा खुर्द 50, नवेगाव 3, सोनेगाव 5 बोरगाव बुद्रुक 12, मानेगाव 31, वाकेश्वर 31 ,चिखलपहेला 22 ,बोरगाव खुर्द 2,निमगाव 23, चांदोरी 12, अड्याळ 45 , खैरेदिवाण ६१ ,पचखेडी 4 अंबाडी 11, असे एकूण 954 अर्ज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले.आंदोलन यशस्वी करण्याकरता नम्रता बागडे उपाध्यक्ष ,,मनीषा भांडारकर विदर्भ कार्याध्यक्ष, सोमना सरोजकर विदर्भ अध्यक्ष, वैशाली रामटेके भंडारा जिल्हाध्यक्ष, सीमा काळे भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष पूजा पाटील विदर्भ उपाध्यक्ष, संगमित्रा चव्हाण भंडारा जिल्हा उपाध्यक्ष,चरण शहारे, ,पांडुरंग नंदागवळी , , प्रकाश ठवकर, ,विनायक भोयर, दशरथ भोयर ,शामराव बडगे ,देवराम कातोरे, लिलाबाई अंबादे रमेश भोईर रामा टिचकुले, महादेव बडगे ,भाऊराव भोयर, हंसराज अंबादे,सुनंदा टिचकुले, रामकृष्ण वैद्य ,लक्ष्मी वैद्य ,ज्ञानेश्वर टिचकुले प्रफुल सुखदेव ,शरद बडगे ,सोपान ठवकर , मोरेश्वर देऊळकर ,सहादेव टिचकुले ,वनिता ठवकर ,रघुवीर टिचकुले सारू कानतोडे ,श्यामराव कावळे, मारुती वैद्य , मारुती कावळे, मुक्ता सुखदेवे, पार्वता चौधरी ,नीलकंठ टिचकुले ,परमेश्वर टिचकुले ,सुभाष टिचकुले सुधीर सुखदेवे ,गंगा वैद्य ,अशोक टिचकुले ,अस्मिता भोयर ,प्रल्हाद सुखदेवे ,भोलाराम ठवकर, सुरेश बडगे , राजकुमार मेश्राम, गुरुदेव कातोरे, आसाराम बावनकर, भधु शेलोकर किशोर फळे भाऊराव देशमुख, मनीषा घोडेस्वार, पुंडलिक उकरे, मूलचंद तीघरे, मूलचंद रिचडे काळुबाई कानतोडे सतीश बावनकर देवराव वंजारी, कवळू धरमशहारे, रंजू रामटेके प्रिया राऊत ,प्रियंका ,कांबळे यांनी सहकार्य केले.

National

spot_img

International

spot_img
RELATED ARTICLES